Top News

प्राचीन महाराष्ट्रातील 5 घराणे सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार | MPSC Notes 2026

प्राचीन महाराष्ट्रातील 5 घराणे: सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार | MPSC Notes 2026

प्राचीन महाराष्ट्रातील घराणे: Most Imp Notes 5 मार्क पक्के

VisionGov विशेष: मित्रांनो, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार या 5 घराण्यांवर MPSC, पोलीस भरती, तलाठी मध्ये दरवर्षी 3 ते 5 प्रश्न हमखास येतात. तरी पण विद्यार्थी या टॉपिक कडे दुर्लक्ष करतात. आज आपण एकदम शॉर्ट मध्ये, सोप्या भाषेत, Trick सहित महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास जाणून घेऊया. चला सुरू करूया.

1. सातवाहन कालखंड (इ. स. पू. 230 ते इ. स. 230)

प्रस्तावना: सातवाहनांनी राजकीय स्थैर्य, उत्कृष्ट प्रशासन, धार्मिक सहिष्णुता व व्यापारास चालना दिल्याने सुस्थिर शासन निर्माण केले. त्यामुळे कला, स्थापत्य व साहित्यामध्येही भरभराट झाली. सातवाहनाच्या 30 राजांनी 460 वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्त्व प्राप्त करून देणारे सातवाहन हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय.

मूळ स्थान व कालखंड: सातवाहनांच्या मूळ स्थानाविषयी विद्वानांमध्ये एकमत नाही. काही इतिहासकारांच्या मते ते मूळचे आंध्रप्रदेशचे आहेत. तर डॉ. मिरांशीच्या मताप्रमाणे सातवाहनांचा मूळ प्रदेश विदर्भ होय. उपलब्ध ऐतिहासिक साधनांवरून सातवाहनांचे मूळ स्थान महाराष्ट्र असून पैठण (प्रतिष्ठान) ही त्यांची राजधानी होय.

सातवाहन राजवंशातील प्रमुख राजे

1) सिमुक – सिमुक हा सातवाहन राजवंशाचा संस्थापक होय. राजा सिमुकने शेवटचा कण्व राजा सुशर्मा याला ठार केले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली. याने ‘विदर्भ’ आणि ‘विदिशा’ जिंकून घेतले व स्वतःला ‘दक्षिणपथपती’ असे बिरुद धारण केले.

2) सातकर्णी प्रथम – राजा सिमुक नंतर त्याचा लहान भाऊ ‘कृष्ण’ गादीवर आला. त्याने नाशिक जिंकून घेतले व 18 वर्षे राज्य केले. राजा कृष्णाच्या नंतर सिमुकचा मुलगा सातकर्णी याला राज्य मिळाले. सातकर्णी प्रथम व त्याची राणी नागनिका यांची प्रतिमा जुन्नरच्या (नाणेघाट) प्रतिमा मालिकेत कोरल्याचे पुरावे मिळतात. हा पराक्रमी व मुत्सद्दी राजा होता. याने कलिंग नरेश खारवेलचा पराभव केला. हा वैदिक धर्माचा कट्टर पुरस्कर्ता होता. त्याने आपल्या हयातीत दोन अश्वमेध यज्ञ व एक राजसूय यज्ञ केल्याचे पुरावे आहेत. प्रथम सातकर्णीच्या शौर्यामुळे या राजवंशातील सर्व राजे आपल्या नावासमोर सातवाहन असा शब्दप्रयोग न करता ‘सातकर्णी’ असाच करू लागले. यानंतर सुमारे एक शतक सातवाहनांच्या वाढत्या सत्तेला व सामर्थ्याला पायबंद बसला. सातकर्णीनंतर शकांच्या आक्रमणापुढे सातवाहनांचे राज्य दुर्बल बनले. राजा हाल या सातवाहन राजाबद्दल फक्त वाङ्मयीन साधनांच्या आधारे माहिती मिळते. याने प्राकृत भाषेला राजाश्रय देऊन ‘गाथा सप्तशती’ हा प्राकृत काव्य संग्रह रचल्याची माहिती मिळते.

MPSC साठी 7 One-Liner Points - सातवाहन

  1. संस्थापक: सिमुक. त्याने कण्व राजा सुशर्मा ला मारले.
  2. बिरुद: सिमुक = ‘दक्षिणपथपती’. विदर्भ, विदिशा जिंकले.
  3. कृष्ण: सिमुकचा भाऊ. नाशिक जिंकले. 18 वर्षे राज्य.
  4. सातकर्णी I: सिमुकचा मुलगा. राणी नागनिका. नाणेघाट शिलालेख.
  5. सातकर्णी I चे कार्य: कलिंग नरेश खारवेलचा पराभव. 2 अश्वमेध + 1 राजसूय यज्ञ. वैदिक धर्माचा पुरस्कर्ता.
  6. नाव बदल: सातकर्णी I नंतर सर्व राजे ‘सातकर्णी’ लावू लागले.
  7. राजा हाल: प्राकृत भाषेला राजाश्रय. ‘गाथा सप्तशती’ ग्रंथ रचला.
Trick: सिमुक = संस्थापक + दक्षिणपथपती. सातकर्णी I = अश्वमेध + नाणेघाट + खारवेल. हाल = गाथा सप्तशती.

2. वाकाटक घराणे

अजंठा लेण्यांमध्ये वाकाटकांना ‘वाकाटक वंशकेतू’ असे म्हटले आहे. वायुपुराण व बिदर ताम्रपटातून ‘विंध्यशक्ती’ याला वाकाटक घराण्याचा संस्थापक असे म्हटले आहे. विंध्यशक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र प्रथम प्रवरसेन याने इ. स. 270 ते इ. स. 330 पर्यंत 60 वर्षे राज्य केले. हा या घराण्यातील सर्वांत बलशाली राजा होय.

1) ज्येष्ठ शाखा – प्रवरसेन पुत्र गौतमीपुत्र यांचा मुलगा पहिला रुद्रसेन जो समुद्रगुप्ताचा समकालीन होता. यानंतर याचा पुत्र पृथ्वीसेन हा राजा बनला. त्याने आपला मुलगा दुसरा रुद्रसेनचा विवाह दुसरा चंद्रगुप्ताची कन्या प्रभावती गुप्तशी केला व राजधानी नागपूरजवळ नंदिवर्धन येथे आणली. इ. स. 490 च्या सुमारास वाकाटकांची ज्येष्ठ शाखा ही वत्सगुल्म शाखेत विलीन झाली.

2) वत्सगुल्म शाखा – पहिल्या प्रवरसेनचा द्वितीय पुत्र सर्वसेन याने राजधानी वत्सगुल्म (सध्याचे वाशिम) येथे स्थापन केली. सर्वसेन हा उत्तम कवी होता. त्याने ‘धर्ममहाराज’ ही उपाधी घेतली व ‘हरिविजय’ या प्राकृत काव्याची रचना केली. कवी कालिदासाचे अनेक वर्षे वाकाटकांकडे वास्तव्य असल्याने त्यांनी ‘मेघदूत’ ची रचना येथे केली.

3. बदामीचे चालुक्य घराणे

राजकीय परिस्थिती – बदामीच्या चालुक्य घराण्यातील पहिला राजा जयसिंह होय. पहिला पुलकेशी हा या घराण्यातील बलशाली राजा होय. याने अश्वमेध यज्ञ केला. साम्राज्याची व वातापी (बदामी) या राजधानीची पायाभरणी यानेच केली. कीर्तिवर्मन हा एक पराक्रमी राजा बदामीच्या चालुक्य घराण्यात होऊन गेला. दुसरा पुलकेशी हा या घराण्यातील सर्वात पराक्रमी व बलशाली राजा होय.

उत्तर भारतातील प्रभावशाली व सामर्थ्यवान राजा हर्षवर्धन याचे आक्रमण झाले; परंतु झालेल्या युद्धात हर्षवर्धनचा पराभव करून चालुक्य राजा दुसरा पुलकेशीने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. ऐहोळ येथील शिलालेखात रविकीर्ती याने दुसऱ्या पुलकेशीने हर्षवर्धनावर मिळवलेल्या विजयाची माहिती मिळते. यानंतर त्याने कलिंग व कोसल हे देश ही जिंकले.

पल्लव राजा नरसिंह वर्मा याने पुलकेशीचा पराभव केला. दुसरा कीर्तिवर्मन हा या घराण्यातील शेवटचा राजा होय. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने याचा पराभव करून ही सत्ता संपुष्टात आणली.

चालुक्यांचे योगदान – कवी बिल्हण ने ‘विक्रमांक-देवचरित’, विज्ञानेश्वराचे ‘मिताक्षरा’, पंपाचे ‘पंपरामायण’ सोमेश्वर तिसरा याचे ‘मानसोल्लास’ अशा अनेक ग्रंथांची निर्मिती झाली.

4. राष्ट्रकूट घराणे

राजकीय इतिहास – दंतीदुर्ग हा या घराण्याचा संस्थापक राजा होय. प्रारंभी हा गुजरातमधील चालुक्यांचा सामंत अधिकारी होता. चालुक्यांच्या दुर्बळ उत्तराधिकारी राजांचा फायदा घेत याने आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली.

कृष्ण प्रथम या राजाने जगप्रसिद्ध असलेले वेरूळ येथील कैलास मंदिर बांधले.

अमोघवर्ष हा एक साहित्यिक व शांतताप्रिय राष्ट्रकूट राजा होऊन गेला. त्याने ‘रत्नमालिका’‘कविराजमार्ग’ या ग्रंथांची रचना केली. राजा कर्क हा राष्ट्रकूटांचा शेवटचा राजा होय. कल्याणीचे चालुक्य व परमारांनी केलेल्या आक्रमणामुळे राष्ट्रकूटांचा सत्तेचा नाश झाला.

धार्मिक परिस्थिती – राष्ट्रकूट राजे हे जैन धर्माचे अनुयायी होते. तरीही त्यांनी हिंदू मंदिरे बांधून शैव व वैष्णव धर्मालाही राजाश्रय दिलेला होता. बौद्ध विहार बांध्याचीही दाखले मिळतात. थोडक्यात, राष्ट्रकूट राजे हे धार्मिक दृष्ट्या सहिष्णुताव बाळगणारे होते.

कला व स्थापत्य – राष्ट्रकूट काळात कला व स्थापत्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती झाल्याचे तत्कालीन मंदिर व शिल्पातून दिसून येते. वेरूळचे कैलास लेणे हे एकाच दगडात कोरलेले व जगप्रसिद्ध असलेले मोठे लेणे होय.

5. शिलाहार घराणे

इ.स.765 च्या सुमारास राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथमने कोकणातील काही भाग जिंकून शिलाहारांना येथील सामंत म्हणून नेमले. शिलाहारांनी गोमंतक येथील बलीपट्टण येथे आपली राजधानी बनवली. शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे निर्माण झाली.

दक्षिण कोकणचे शिलाहार – या घराण्याचा मूळ संस्थापक विदयाधार जीमूतवाहन हा असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर (तेर) हे त्याचे मूळ स्थान होय. ‘सोनेरी गरुड पक्ष्याचे चिन्ह’ हे जीमूतवाहन राजघराण्याच्या निशाणावर असल्याचे दिसून येते.

उत्तर कोकणचे शिलाहार – दक्षिण कोकणातील शिलाहारांपेक्षा कमी प्राचीन असलेले घराणे म्हणजे उत्तर कोकणचे शिलाहार होय. ‘कपर्दी’ हा या घराण्याचा मूळ पुरुष होय. प्रारंभी हा राष्ट्रकूटांचा मांडलिक होता.

कोल्हापूरचे शिलाहार – शिलाहारांचे तिसरे घराणे कोल्हापूर, मिरज, क-हाड व कोकणच्या काही भागांवर राज्य करत होते.

MPSC साठी 17 One-Liner - हेच विचारतात 🔥

  1. वाकाटक: संस्थापक: विंध्यशक्ती. बिरुद: वाकाटक वंशकेतू.
  2. सर्वात बलशाली: प्रथम प्रवरसेन. 60 वर्षे राज्य.
  3. वत्सगुल्म शाखा: सर्वसेन. उपाधी: धर्ममहाराज. ग्रंथ: हरिविजय.
  4. कालिदास: वाकाटकांकडे असताना मेघदूत लिहिले.
  5. बदामी चालुक्य: पहिला राजा: जयसिंह. राजधानी: वातापी/बदामी.
  6. सर्वात पराक्रमी: दुसरा पुलकेशी. हर्षवर्धनचा पराभव केला. ऐहोळ शिलालेख रविकीर्तीने लिहिला.
  7. शेवटचा राजा: दुसरा कीर्तिवर्मन. कृष्ण I राष्ट्रकूट ने हरवले.
  8. ग्रंथ: बिल्हण - विक्रमांक-देवचरित. विज्ञानेश्वर - मिताक्षरा.
  9. राष्ट्रकूट: संस्थापक: दंतीदुर्ग. पूर्वी चालुक्यांचा सामंत.
  10. कृष्ण I: वेरूळचे कैलास मंदिर बांधले.
  11. अमोघवर्ष: रत्नमालिका, कविराजमार्ग ग्रंथ लिहिले.
  12. धर्म: जैन धर्मीय, पण सर्व धर्मांना आश्रय.
  13. शेवटचा राजा: कर्क.
  14. शिलाहार: 3 शाखा: दक्षिण कोकण, उत्तर कोकण, कोल्हापूर.
  15. दक्षिण कोकण: संस्थापक जीमूतवाहन. चिन्ह: सोनेरी गरुड. मूळ: तेर/तगर.
  16. उत्तर कोकण: मूळ पुरुष: कपर्दी.
  17. नेमणूक: कृष्ण I राष्ट्रकूट ने 765 AD मध्ये सामंत म्हणून नेमले.
Super Trick: वाकाटक = कालिदास + मेघदूत. चालुक्य = पुलकेशी II + हर्ष + ऐहोळ. राष्ट्रकूट = कृष्ण I + कैलास. शिलाहार = 3 शाखा + सोनेरी गरुड.

6. 5 घराण्यांची तुलना - एका नजरेत

घराणे संस्थापक राजधानी सर्वात महत्वाचा राजा MPSC साठी 1 Point
सातवाहन सिमुक पैठण सातकर्णी I दक्षिणपथपती, नाणेघाट, गाथा सप्तशती
वाकाटक विंध्यशक्ती नंदिवर्धन, वत्सगुल्म प्रथम प्रवरसेन कालिदास - मेघदूत
चालुक्य जयसिंह वातापी/बदामी दुसरा पुलकेशी हर्षवर्धनचा पराभव, ऐहोळ शिलालेख
राष्ट्रकूट दंतीदुर्ग मान्यखेट कृष्ण I कैलास मंदिर, अमोघवर्ष - कविराजमार्ग
शिलाहार जीमूतवाहन बलीपट्टण जीमूतवाहन 3 शाखा, सोनेरी गरुड चिन्ह

निष्कर्ष - VisionGov Academy

मित्रांनो, सातवाहन ते शिलाहार हा 1000 वर्षांचा इतिहास MPSC मध्ये 5 मार्कांचा आहे. वर दिलेले 30 One-Liner जर पाठ केले तर Prelims आणि Mains दोन्हीला उपयोगी पडतील. सातवाहन = 460 वर्षे, वाकाटक = कालिदास, चालुक्य = पुलकेशी + ऐहोळ, राष्ट्रकूट = कैलास, शिलाहार = 3 शाखा एवढे जरी लक्षात ठेवले तरी 2 मार्क पक्के.

तर मित्रांनो तुम्हाला हा लेख नक्की आवडला असेल तर कमेंट करा मी रिप्लाय देतो. पुढचा टॉपिक कोणता हवा? यादव घराणे, बहामनी राज्य? खाली सांगा.

Post a Comment

Previous Post Next Post